उदय प्रकाश याचं जगणं आणि लेखन यांची फारकत करता येत नाही!
उदय प्रकाश यांची कविता जितकी समूहाची आहे, तितकीच ती व्यक्तीचीही आहे. माणसाच्या जीवनमरणाचा विचार करणारी ही कविता आहे. ‘माणूस जागा राहावा’ म्हणून सतत पहारा देणारी ही जागल्याची कविता आहे. ही कविता नाही, एका जिवंत मनाचं शब्दांतून भेटणं आहे. उदय प्रकाश यांची कविता विधानांची कविता आहे. ही विधानं शिलालेखांसारखी आहेत.......